शिक्षणतज्ञ निलेश निमकर
नमस्कार मित्रांनो, 'सुलभका'च्या भुमिकेतून लेकरांचे शिकणे सुलभ करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षकबांधवांकडून वर्गावर्गातून तसेच परिसरातून दिले जाणारे आनंददायी, कृतीयुक्त अध्ययन अनुभव या 'ब्लॉग'च्या माध्यमातून वेळोवेळी प्रसारित करण्याच्या हेतुनेच हा ब्लॉग निर्मीती प्रपंच. काही सुचना असल्यास अवश्य कळवा..स्वागत आहे.
Pages
- प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम
- नवनिर्मिती लर्निंग फाउंडेशन
- मराठीतून विज्ञान शिक्षण
- सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन
- अरविंद गुप्ता-दि टॉय मेकर
- नेट शिका डॉट कॉम
- यू कॅन लर्न एनीथिंग
- सानेगुरूजींचे साहित्य
- मराठी शाळा डॉट इन
- मराठी विश्वकोष
- शब्दक्रीडा दालन
- मराठी ई-पुस्तके.
- मराठी इंटरनेट
- ऑनलाइन नवोदय चाचणी
- इयत्ता १ ते ८ साठी प्रश्नसंच (psm)
- PSM प्रशिक्षण नोंदणी प्रपत्र
- अवकाशवेध
- पालकनीती
- बालनगरी
- शासन निर्णय
- बालभारती
- दि फ्री मॅथ्स
- गणित स्रोत
- शिक्षक कट्टा
- क्वेस्ट
- नवोपक्रमशील शाळा व शिक्षकांच्या माहितीचे प्रपत्र
- ATF-MAHARASHTRA
- WE LEARN ENGLISH-RADIO PROGRAMMES
Monday 12 October 2015
सुलभक:किशोर काठोले आणि टीम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोजने.
तानसा अभयारण्यात प्रत्यक्ष जाऊन साजरा केला वन्यजीव सप्ताह.
आपल्या पाठ्यपुस्तकांमधे अनेक पाठ मानव व निसर्ग यांचे नाते सांगणारे आहेत. पण हे पाठ बहुदा पाठ्यपुस्तक व चार भिंतीच्या पलिकडे नाही जात.
ह्या सगळ्या पलीकडे जायला हवे. मी बर्याचदा संधी मिळेल तेव्हा वर्गाबाहेर जातोच. त्यातलाच हा एक नमुनआमच्या मोज शाळेपासुन दिड किलोमिटर अंतरावर तानसा अभयारण्याची हद्द सुरू होते. दर वर्षी गावातील वनपाल शाळेत येऊन वन्यजीव सप्ताहा बद्द्ल शाळेत मुलांशी बोलायचे. या वर्षी आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन जरा वेगळ्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले.
गावातच राहाणाऱ्या वनपालांशी चर्चा केली. ठरल्या प्रमाणे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच शाळेतुन सर्व शिक्षक, वनपाल व ईयत्ता 5,6,7,8,ची सगळी मुलं जंगलात निघालो. एरवी काहीना काही निमित्ताने जंगलात फिरणारी ही आमची मुलं आज भलतीच उत्साहात होती. काही अंतर चालल्या नंतर मधेच थांबुन वनपालांनी मुलांचे दोन गट केले व स्वतः मधे उभे राहुन मुलांना ते म्हणाले की एक गट हा राखिव जंगलात आहे तर एक गट संरक्षित जंगलात. पुढे त्यांनी प्रादेशिक वनांची माहिती देऊन आपल्या अभयारण्याचे क्षेत्र किती?, किती तालुक्यांत ते पसरले आहे? याची कल्पना दिली.
पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. काही अंतर चालल्यावर एका झाडाच्या सावलीत सगळे जमलो.आता वनपालांनी वन्यजीवांची गणना कशाप्रकारे केली जाते?, हे सविस्तर समजावुन सांगीतले, त्याच्याच जोडीला पर्यावरण संतुलनासाठी वन्यजीवांचे अस्तित्व कसे महत्वाचे आहे यावर चर्चा झाली. साधारण पणे जंगलाचा जास्तीत जास्त परिसर नजरेस येईल अशा एका टेकडीवर वनपालांची संरक्षक कुटी आहे तिथे सगळेजण पोहचलो. आता कुटीसमोरच्या झाडांच्या सावलीत बसुन पुन्हा गप्पांचा कार्यक्रम रंगला. जंगलातुन कशाप्रकारे रोजगार मिळतो?, कोणती वनौषधी उपलब्ध होते?, जंगल संरक्षण व जंगल आभ्यासाची काय गरज आहे?, मानव व निसर्ग यांचे काय नाते आहे?, या आणि ईतर अनेक विषयांवर वनपालांना मुलांनी बोलतं केलं. तिथेच शाळेतील शिक्षकांनी वनपालांचे आभर मानले आणि वनपालांनीही मुलांना पुन्हा जंगलात येण्याचे अव्हाऩ केले.
विद्य़ार्थ्यांच्या अल्पोपहारासाठी नेलेल्या खाउचे कागददेखील मुलांनी वेचुन घेतले. एकुणच जंगलात फिरतांना वन्यजीवांच्या या घरी आपण पाहुणे म्हणुन आलोय तर आपण येथे कसे वागावे याचा उत्तम पाठ मुलांनी आपल्या कृतीतुन दाखवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे। या उक्ती प्रमाणे आपल्या सग्या सोयऱ्यांना आज प्रत्यक्ष भेटुन आल्याचा आनंद एवढं चालुन सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.
शब्दांकन- श्री.पुंढलीक पाटील,संजय फराड,गुरुनाथ काळे,सुरेश ठाकरे,रोहिदास वाघ,किशोर काठोले.
आपल्या पाठ्यपुस्तकांमधे अनेक पाठ मानव व निसर्ग यांचे नाते सांगणारे आहेत. पण हे पाठ बहुदा पाठ्यपुस्तक व चार भिंतीच्या पलिकडे नाही जात.
ह्या सगळ्या पलीकडे जायला हवे. मी बर्याचदा संधी मिळेल तेव्हा वर्गाबाहेर जातोच. त्यातलाच हा एक नमुनआमच्या मोज शाळेपासुन दिड किलोमिटर अंतरावर तानसा अभयारण्याची हद्द सुरू होते. दर वर्षी गावातील वनपाल शाळेत येऊन वन्यजीव सप्ताहा बद्द्ल शाळेत मुलांशी बोलायचे. या वर्षी आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन जरा वेगळ्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले.
गावातच राहाणाऱ्या वनपालांशी चर्चा केली. ठरल्या प्रमाणे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच शाळेतुन सर्व शिक्षक, वनपाल व ईयत्ता 5,6,7,8,ची सगळी मुलं जंगलात निघालो. एरवी काहीना काही निमित्ताने जंगलात फिरणारी ही आमची मुलं आज भलतीच उत्साहात होती. काही अंतर चालल्या नंतर मधेच थांबुन वनपालांनी मुलांचे दोन गट केले व स्वतः मधे उभे राहुन मुलांना ते म्हणाले की एक गट हा राखिव जंगलात आहे तर एक गट संरक्षित जंगलात. पुढे त्यांनी प्रादेशिक वनांची माहिती देऊन आपल्या अभयारण्याचे क्षेत्र किती?, किती तालुक्यांत ते पसरले आहे? याची कल्पना दिली.
पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. काही अंतर चालल्यावर एका झाडाच्या सावलीत सगळे जमलो.आता वनपालांनी वन्यजीवांची गणना कशाप्रकारे केली जाते?, हे सविस्तर समजावुन सांगीतले, त्याच्याच जोडीला पर्यावरण संतुलनासाठी वन्यजीवांचे अस्तित्व कसे महत्वाचे आहे यावर चर्चा झाली. साधारण पणे जंगलाचा जास्तीत जास्त परिसर नजरेस येईल अशा एका टेकडीवर वनपालांची संरक्षक कुटी आहे तिथे सगळेजण पोहचलो. आता कुटीसमोरच्या झाडांच्या सावलीत बसुन पुन्हा गप्पांचा कार्यक्रम रंगला. जंगलातुन कशाप्रकारे रोजगार मिळतो?, कोणती वनौषधी उपलब्ध होते?, जंगल संरक्षण व जंगल आभ्यासाची काय गरज आहे?, मानव व निसर्ग यांचे काय नाते आहे?, या आणि ईतर अनेक विषयांवर वनपालांना मुलांनी बोलतं केलं. तिथेच शाळेतील शिक्षकांनी वनपालांचे आभर मानले आणि वनपालांनीही मुलांना पुन्हा जंगलात येण्याचे अव्हाऩ केले.
विद्य़ार्थ्यांच्या अल्पोपहारासाठी नेलेल्या खाउचे कागददेखील मुलांनी वेचुन घेतले. एकुणच जंगलात फिरतांना वन्यजीवांच्या या घरी आपण पाहुणे म्हणुन आलोय तर आपण येथे कसे वागावे याचा उत्तम पाठ मुलांनी आपल्या कृतीतुन दाखवला. वृक्षवल्ली आम्हा सोयरे। या उक्ती प्रमाणे आपल्या सग्या सोयऱ्यांना आज प्रत्यक्ष भेटुन आल्याचा आनंद एवढं चालुन सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.
शब्दांकन- श्री.पुंढलीक पाटील,संजय फराड,गुरुनाथ काळे,सुरेश ठाकरे,रोहिदास वाघ,किशोर काठोले.
Subscribe to:
Posts (Atom)