Monday 12 October 2015

सुलभक:शिक्षणतज्ञ मा. निलेश निमकर सर-काय आहे ज्ञानरचनावाद?


शिक्षणतज्ञ निलेश निमकर

ATF-MAHARASHTRA चे संकेतस्थळ

सुलभक:किशोर काठोले आणि टीम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,मोजने.

तानसा अभयारण्यात प्रत्यक्ष जाऊन साजरा केला वन्यजीव सप्ताह.
आपल्या  पाठ्यपुस्तकांमधे अनेक पाठ मानव  व निसर्ग  यांचे  नाते  सांगणारे  आहेत.  पण हे  पाठ बहुदा  पाठ्यपुस्तक व चार भिंतीच्या पलिकडे नाही जात.
ह्या  सगळ्या पलीकडे जायला हवे.  मी बर्‍याचदा संधी मिळेल तेव्हा वर्गाबाहेर जातोच. त्यातलाच  हा एक नमुनआमच्या मोज शाळेपासुन दिड किलोमिटर अंतरावर तानसा अभयारण्याची हद्द सुरू होते. दर वर्षी गावातील वनपाल शाळेत येऊन वन्यजीव सप्ताहा बद्द्ल शाळेत मुलांशी बोलायचे. या वर्षी आम्ही सर्व शिक्षकांनी मिळुन जरा वेगळ्या पद्धतीने हा सप्ताह साजरा करण्याचे नियोजन केले.


गावातच राहाणाऱ्या वनपालांशी चर्चा केली. ठरल्या प्रमाणे 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजताच शाळेतुन सर्व शिक्षक, वनपाल व ईयत्ता 5,6,7,8,ची सगळी मुलं जंगलात निघालो.  एरवी काहीना काही निमित्ताने जंगलात फिरणारी ही आमची मुलं आज भलतीच उत्साहात होती. काही अंतर चालल्या नंतर मधेच थांबुन वनपालांनी मुलांचे दोन गट केले व स्वतः मधे उभे राहुन मुलांना ते म्हणाले की एक गट हा राखिव जंगलात आहे तर एक गट संरक्षित जंगलात. पुढे त्यांनी प्रादेशिक वनांची माहिती देऊन आपल्या अभयारण्याचे क्षेत्र किती?, किती तालुक्यांत ते पसरले आहे? याची कल्पना दिली.


 पुन्हा पुढे चालायला सुरुवात झाली. काही अंतर चालल्यावर एका झाडाच्या सावलीत सगळे जमलो.आता वनपालांनी वन्यजीवांची गणना कशाप्रकारे केली जाते?, हे सविस्तर समजावुन सांगीतले, त्याच्याच जोडीला पर्यावरण संतुलनासाठी वन्यजीवांचे अस्तित्व कसे महत्वाचे आहे यावर चर्चा झाली.  साधारण पणे जंगलाचा जास्तीत जास्त परिसर नजरेस येईल अशा एका टेकडीवर वनपालांची संरक्षक कुटी आहे तिथे सगळेजण पोहचलो. आता कुटीसमोरच्या झाडांच्या सावलीत बसुन पुन्हा गप्पांचा कार्यक्रम रंगला. जंगलातुन कशाप्रकारे रोजगार मिळतो?, कोणती वनौषधी उपलब्ध होते?, जंगल संरक्षण व जंगल आभ्यासाची काय गरज आहे?, मानव व निसर्ग यांचे काय नाते आहे?, या आणि ईतर अनेक विषयांवर वनपालांना मुलांनी बोलतं केलं. तिथेच शाळेतील शिक्षकांनी वनपालांचे आभर मानले आणि वनपालांनीही मुलांना पुन्हा जंगलात येण्याचे अव्हाऩ केले.

विद्य़ार्थ्यांच्या अल्पोपहारासाठी नेलेल्या खाउचे कागददेखील मुलांनी वेचुन घेतले. एकुणच जंगलात फिरतांना वन्यजीवांच्या या घरी आपण पाहुणे म्हणुन आलोय तर आपण येथे कसे वागावे याचा उत्तम पाठ मुलांनी आपल्या कृतीतुन दाखवला.  वृक्षवल्ली आम्हा सोयरे। या उक्ती प्रमाणे आपल्या सग्या सोयऱ्यांना आज प्रत्यक्ष भेटुन आल्याचा आनंद एवढं चालुन सुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्टच दिसत होता.
























शब्दांकन- श्री.पुंढलीक पाटील,संजय फराड,गुरुनाथ काळे,सुरेश ठाकरे,रोहिदास वाघ,किशोर काठोले.