●●वर्गभोजन●●
गोष्ट तशी मागील आठवड्यातिल पण फारच रुचकर बरं का. मला आठवते परिसर अभ्यास भाग १ मधील एक पाठ शिकवत होतो 'आहाराची पौष्टिकता' .यातील घटक 'प्रमुख अन्नपदार्थ' व 'अन्नपदार्थातिल विविधता ' समजावून देत असताना विविधता कशी असते यासाठी वेगवेगळ्या अन्नपदार्थांची व काही नास्ट्याच्या पदार्थांची नावे सांगत असताना त्यातील घटकही सांगत होतो। तेव्हा असे लक्षात आले की यातील बऱ्याच पदार्थांची नावे मुलांनी अजुनही ऐकली नव्हती किंवा पाहिलिही नव्हती तेव्हा खाणे तर दूरच राहिले। परंतु काही मुलांना त्यातील नावे चांगलीच परिचयाची होती तसेच काहींनी त्यांचा आस्वाद घरी अथवा बाहेर घेतलेला होता। मला अचानक तेव्हा एक कल्पना सुचली की ज्याच्यान्ने जमेल त्यांनी त्यातील एखादा पदार्थ त्यांच्या घरी बनवून मागायचा (त्याची गरज व पार्श्वभूमी आधी घरी सांगायची)व वर्गात आणून सर्वांनी गोपाल काल्या प्रमाणे सर्वपदार्थांचा आस्वाद घ्यायचा व त्यातील घटकांची ओळख करून घ्यायची। मी म्हणालो की येणाऱ्या बुधवारी आपण त्याचे प्लानिंग करुया। पण वाटते काही मुलांना बहुतेक प्लानिंग म्हणजे समजलं नसावं। मी वर्गात गेल्यावर बऱ्याच मुलात चुळबुळ सुरु दिसली ।मला काहीच समजत नव्हतं । तेव्हा मुलेच म्हणाली की निधि ,पलक व चेतन ने काहीतरी घरून बनवून आणलं आहे। मला काहीच समजत नव्हतं मग मीच त्यांना विचारलं तेव्हा ते बोलते झाले व म्हणाले की सर तुम्ही सांगितल्या प्रमाने आम्ही घरून पदार्थ बनवून आणले पण बाकिच्यांनी काहीच आणलं नाही ।(इतरांनी काहीच आणलं नसल्याने त्यांचा हिरमोड झाला असावा बहुतेक.) मी म्हणालो की आज सांगणार होतो केव्हा बनवून आणायाचे ते आणि तुम्ही आजच कसे आणलात? बरं जावू दया। आधी पाहु तर दया काय आणले ते.बघतो तर काय निधिने डबाभर पोहे(आलू पोहा) पलकने पकोड़े (भजी) व चेतनने सुद्धा पकोड़े आणले होते ।त्यांचा खमंग वास सुटला होता। मी आधीच (उत्सुकतेपोटी) चव घेवुन बघितली ।खुपच टेस्टी झाले होते सर्व। मी मुलांना त्यातील घटक कोणते ते सर्व समजावून सांगितले। मग आता या पदार्थांचे करायचे काय ?मुलेच विचारू लागली म्हणजे बहुतेक त्यांना सुद्धा खावुन बघायचे होते। पण इतकेसे 35 मुलांना पुरणार तरी कसे? मी सुद्धा विचार केला व म्हणालो की सर्वांनाच मिळणार पण प्रसादासारखे कबुल.सर्वांनी होकार दिला। मग ज्यांनी पदार्थ आणले होते त्यांनी सर्वांना थोड़े थोड़े पुरवले। सर्वांनी आस्वाद घेतला पण मनसोक्त नाही। मग मीच म्हणालो पुढच्या बुधवारी शक्य तेवढ्या मुलांनी असेच पदार्थ बनवून आणा मग आपण वर्गभोजनच घडवून आणू। सर्व मुले होय म्हणाली व ही मुले पण डबल(दुसर्यांदा)आणणार आहेत। मी मात्र वाट पाहत आहे येणाऱ्या बुधवारची (21/10/2015 ची)....................